सारांश: कोल्हापूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने ३ अट्टल चोरट्यांना अटक करून ३२ घरफोडी व १ दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला. ६१ तोळे सोनं, ४.७८ किलो चांदी व वाहनांसह एकूण ६७.४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सलीम, जावेद व तौफिक शेख ही सावत्र भावांची टोळी असून त्यांनी कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत गुन्हे केले. या कारवाईत पोलिसांनी सायबर सेलसह विविध पथकांच्या मदतीने सातत्यपूर्ण तपास करून मोठं यश मिळवलं.
कोल्हापूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडींच्या घटनांचा अखेर पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. ३ अट्टल चोरट्यांना अटक करत तब्बल ३२ घरफोडी आणि १ दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून, सुमारे ६७ लाख ४८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील अंमलदारांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे, ११ एप्रिल २०२५ रोजी शाहुवाडी तालुक्यातील आंबाघाट येथे सापळा रचून ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:
1. सलीम महंमद शेख (३७) – रा. महाड, रायगड
2. जावेद महंमद शेख (३०) – रा. महाड, रायगड
3. तौफिक महंमद शेख (३०) – रा. कोल्हापूर, मूळगाव बेळगाव
सावत्र भावांची गुन्हेगारी टोळी
तपासात आढळले की, हे तिघेही सावत्र भाऊ असून, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा परिसरात अनेक घरफोड्या केल्या आहेत. यातील सलीम शेखवर याआधीही खेड, दापोली, रोहा, माणगाव, पोलादपूर इत्यादी पोलीस ठाण्यांत १२ घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर तौफिक शेख हा मोटरसायकल चोरी प्रकरणातही आरोपी आहे.
हेदेखील वाचा: crime news: दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षांच्या मुलीने केला त्याचा खून
जप्त मुद्देमाल आणि तपशील
तपासादरम्यान आरोपींच्या कब्जातुन खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला:
– सोन्याचे दागिने – ६१ तोळे ८ ग्रॅम
– चांदीचे दागिने – ४ किलो ७८७ ग्रॅम
– घरफोडीत वापरलेली वाहने व हत्यारे
– एकूण किमतीचा मुद्देमाल – रुपये ६७,४८,१५०
गुन्हे उघडकीस आलेले पोलीस ठाण्यांनुसार तपशील:
| पोलीस ठाणे | उघड गुन्हे |
|———————-|————-|
| करवीर | १८ |
| जुना राजवाडा | ५ |
| शाहूपुरी | २ |
| लक्ष्मीपूरी | २ |
| राजारामपुरी | २ |
| गांधी नगर | २ |
| कागल | १ |
| इचलकरंजी (मो.सा. चोरी) | १ |
| एकूण | ३३ |
सखोल तपास सुरूच
तिघांकडून अजूनही कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या कारवाईत सायबर सेलसह अनेक पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डॉ. बी. धीरजकुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके शहर विभाग, सुजितकुमार क्षीरसागर करवीर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,
पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, संदिप बेंद्रे, शुभम संकपाळ, विशाल चौगुले, प्रविण पाटील, अमित सर्जे, अरविंद पाटील, सागर चौगले, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, कृष्णात पिंगळे, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर, राजेश राठोड, रोहित मर्दाने, यशवंत कुंभार, नामदेव यादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक आतिश म्हेत्रे व सर्व पोलीस अंमलदार, यांचे पथकाने केलेली आहे.