जत तालुक्यातील कुंभारी येथे गुटख्याच्या कारणावरून पानटपरी चालकाला मारहाण
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील कुंभारी येथे एका वृद्ध पानटपरी चालकाला किरकोळ कारणावरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण केल्याने पाच जणावर आर्म्स अॅक्ट, शस्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. संशयितांना अटक व्हावी, याकरिता ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. ही घटना मंगळवारी (दि. ३०) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती. याबाबतची फिर्याद बाबूराव महादेव जाधव यांनी जत पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी पाच जणांना अटक करून बुधवारी जत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आनंदा किसन सरगर (वय ३४), योगेश अरुण कांबळे (वय २८), प्रथमेश महादेव दुधाळ (वय २२), शंकर गणपती जाधव (वय २५, सर्व संजय नगर) सांगली या चौघांना पोलिसांनी
तातडीने मोहीम राबवत त्यांचा शोधाशोध घेऊन बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची (तीन ऑगस्टपर्यंत) पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुंभारी येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रथमेश पान शॉप या ठिकाणी संशयित पाच जण गेले होते. यावेळी त्यांनी बाबुराव महादेव जाधव यांना गुटखा मागितला त्यावेळी त्यांनी माझ्याकडे गुटखा विक्रीसाठी नाही असे सांगितले यातूनच वाद झाला. त्यांनी जाधव यांना मारहाण केली होती. यावेळी रिव्हॉल्व्हरचा दाखला दाखवला होता यामुळे वातावरण भीतीचे बनले होते. कुंभारीत असणारे वातावरण सध्या शांततापूर्ण बनले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जीवन कांबळे करीत आहेत.
हे देखील वाचा: Jat local news : जत तालुक्यातील कुंभारी येथे गुंडाच्या टोळीकडून बंदुकीचा धाक दाखवत दहशत; ग्रामस्थांनी 2 तास रोखला महामार्ग
जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे शनिवारी बंजारा समाज व भटक्या-विमुक्त जाती-जमाती मेळाव्याचे आयोजन; सांगली, सोलापूर खासदारांची उपस्थिती
जत तालुक्यातील निगडी बुद्रुक ग्रामपंचायत, सर्व सेवा सोसायटी व काँग्रेस जत तालुका शाखेच्यावतीने बंजारा समाज व भटक्या-विमुक्त जाती-जमाती मेळावा व सत्कार कार्यक्रम शनिवारी (ता. ३) दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सांगलीचे खासदार विशाल पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, कर्नाटकचे उद्योग मंत्री व विजयपूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील असणार आहे.
याशिवाय जालना आमदार राजेश राठोड, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लाला राठोड, सांगली मार्केट कमिटी सभापती सुजय शिंदे यांच्या उपस्थितीत बंजारा समाज व भटक्या विमुक्त जाती-जमाती या समाजाकडून मोठा मेळावा व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
निगडी बुद्रुक येथील रोहित अग्रोटेकमध्ये युवा उद्योजक रोहित राठोड यांनी आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील सर्व तांड्यातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निगडी बुद्रुकच्चा सरपंच सीताबाई हिरामण पवार व निगडी बुद्रुक सर्व सेवा सोसायटी चेअरमन शिवाजी खांडेकर व माजी सरपंच तम्माराय यम्मी यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.
शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवा: विक्रम ढोणे
२९ जुलै २०१४ साली बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते त्या आंदोलनाला पाठिंबा देत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला विश्वास दिला. आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढतो. १० वर्षे झाली पण हा प्रश्न निकाली काढला नाही. धनगर आरक्षणाचा हा प्रवास वेदनादायी आहे. पहिल्या नाही किमान शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी धनगर आरक्षण प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा धनगर विवेक जागृती अभियानाचे सर्वेसर्वा विक्रम ढोणे यांनी व्यक्त केली आहे.
धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे १० पूर्ण झाले असल्याने निषेध व्यक्त करीत धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात
आले. यावेळी विक्रम ढोणे, जयाप्पा खरात, अशोक सलगर, तानाजी कटरे, विलास काळे, प्रशांत कटरे, पांडुरंग खरात, संतोष खरात, धोंडीबा खरात आदी उपस्थित होते.
११ ऑगस्टला सकल ओबीसी समाजाच्यावतीने सांगलीतील तरुण भारत स्टेडियममध्ये महा एल्गार मेळावाचे आयोजन
नियमानुसार मिळणाऱ्या मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मनोज जरांगे यांनी आरक्षणावरुन दिशाभूल करत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शासन व प्रशासनावर दबाव टाकत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बोगस कुणबीचे दाखले काढण्यात आल्याचा आरोप करुन या प्रकरणी न्याय मागण्यासाठी येत्या ११ ऑगस्टला सकल ओबीसी समाजाच्यावतीने सांगलीतील तरुण भारत स्टेडियममध्ये महा एल्गार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केले.
हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 31 जुलै: कर्क, सिंह राशीसह 5 राशींना आर्थिक लाभ, आजच्या राशीत जाणून घ्या कोणाला लाभणार शुक्राचा विशेष आशीर्वाद
यावेळी सांगलीच्या माजी महापौर संगीता खोत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, सांगलीचे माजी नगरसेवक विष्णू माने, कुंभार उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, शिवसेना शहर प्रमुख हरिदास लेंगरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, माजी सभापती आकाराम मासाळ, राजेंद्र कोळेकर, म्हाळाप्पा पुजारी, शंकर वगरे, परशुराम मोरे, निलेश बामणे, महादेव कोळी, प्रमोद हिरवे, संतोष मोटे, समशेर नाईक, योगेश एडके, रवींद्र मानवर, बंडू शेख, बाळू चव्हाण, हिंदुराव शेंडगे, संगीता लेंगरे, रमेश कोळेकर, हेमंत चौगुले आदी उपस्थित होते.
बहुजनांच्या स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विष्णू माने यांनी केले. ओबीसी मेळाव्यास पाचशे गाड्या देणार असल्याचे प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी यावेळी जाहीर केले तर पुजारी यांनी मेळाव्यासाठी मदत देण्याचे जाहीर केले.