Brand Ambassador : अमिताभ बच्चन यांची सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून निवड
आयर्विन टाइम्स / सांगली
वाचाल तर वाचाल हे सर्वश्रुत आहे. वाचनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मोबाइलच्या युगात वाचनाचे महत्त्व टिकावे, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छादूत (Brand Ambassador ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून निवड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
२२ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत महावाचन उत्सव
२२ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत महावाचन उत्सव २०२४ उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनच्या शाळांमधील इयत्ता ३री ते १२वी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता तिसरी ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते १२वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे.
वाचन करून पारितोषिक जिंकण्याची संधी
या उपक्रमाची वैशिष्ट्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांशी नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक, कवीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे. सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई हे वेबपोर्टल तयार करणार आहेत. त्याचा तपशील उत्सव राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता प्राप्त होणार आहे.
वाचनाचा एक मिनिटाचा व्हिडिओ पोर्टलवर करायचा आहे अपलोड
विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार, इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्यातील साहित्यिकांचे साहित्य, कथा. कादंबऱ्या, आत्मचरित्रे आदी साहित्याची निवड करून वाचन करतील. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात महावाचन २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल. या वाचनाचा एक मिनिटाचा व्हिडिओ पोर्टलवर अपलोड करायचा आहे.
प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड तीन वर्गवारीसाठी करण्यात येणार आहे. मागील वर्षी घेण्यात आला होता. यामध्ये ६६ हजार शाळा आणि ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीमध्ये वाढ होते. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम गेल्यावर्षीपासून राबवण्यात येत आहे.
या उपक्रमात ६६ हजार शाळा आणि ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग
२२ नोव्हेंबर २०२३ रोजी महावाचन उपक्रमाचा निर्णय घेण्यात आला होता. या उपक्रमात ६६ हजार शाळा आणि ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रीड इंडिया सेलिब्रेशन या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.