हेदेखील आहेत आपले शिक्षक
शाळेत शिकवणारे शिक्षक आपल्याला शिक्षण देतातच, पण आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात, जे जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगून वेळोवेळी आपले मार्गदर्शन करतात, आपल्याला यशाचा मार्ग दाखवतात. यांची भूमिकाही शाळेच्या शिक्षकांपेक्षा कमी नसते. तसेच, निसर्गही एक शिक्षकासारखा आपल्याला अनगिनत शिकवणी देतो, ज्यांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे.
आपल्याला शिकवून, शिक्षण देऊन एखाद्या योग्य व्यक्ती बनवण्यात आपल्या शाळा-काॅलेजच्या शिक्षकांचा मोठा वाटा असतो, पण याचबरोबर आपल्याला एक चांगला आणि यशस्वी माणूस बनवण्यासाठी आपल्या आजूबाजूला असे लोकही असतात, जे एखाद्या शिक्षकासारखेच असतात. हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात. चला, आपल्या या शिक्षकांबद्दल जाणून घेऊ या, जेणेकरून आपण शिक्षक दिनी आपल्या शाळेच्या शिक्षकांबरोबर त्यांनाही लक्षात ठेवू, त्यांना सन्मान देऊ.
जीवनाच्या शाळेतील या शिक्षकांना जेव्हा तुम्ही सन्मान द्याल, त्यांना खूप आनंद होईल. माणसांव्यतिरिक्त निसर्गही आपल्याला खूप शिकवतो, त्यांना फक्त खोलवर समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या शिकवणींवर लक्ष देतो तेव्हा त्यांच्यामुळे आपल्यालाही खूप चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा मिळते, ज्या आपल्या जीवनाला खूप सुंदर बनवतात. सर्वप्रथम मानवीय शिक्षकांच्या महत्त्वाबद्दल बोलू, मग प्रेरक निसर्गाबद्दल बोलू.
शाळेतील शिक्षकांखेरीज अजूनही आहेत शिक्षक
शाळेच्या शिक्षकांखेरीज आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे वेळोवेळी आपल्याला अशा गोष्टी सांगतात, ज्या आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी महत्त्वाच्या असतात. अशा शिकवणी देणाऱ्यांमध्ये आपल्या घरातील मोठे जसे – आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू आणि मोठे भाऊ-बहीण किंवा मग एखादा शेजारी आणि नातेवाईक असू शकतात. मुलांनी आणि मोठयांनी देखील शिक्षक दिनाच्या निमित्ताने यांच्याकडे जाऊन विशेषत: त्यांचे आभार मानायला हवेत, त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत. तुमचे प्रेम-सन्मान मिळाल्याने ते आनंदित होतील.
निसर्गही आहे आपला शिक्षक
मानवीय शिक्षकांबरोबरच निसर्गही आपला खूप चांगला अध्यापक आहे, त्याचे संदेश आपल्याला अनेक गोष्टींसाठी प्रेरणा देतात, आपण त्याच्या लपलेल्या संदेशाला समजून घ्यायला हवे. निसर्ग आपल्याला कोणती शिकवणी देतो, जाणून घ्या.
नवीन आशा जागवतो सूर्य
सूर्य साऱ्या जगाला प्रकाश आणि जीवन देतो. तो नित्यकाळी वेळेवर उगवतो आणि अस्त होतो. कल्पना करा, जर सूर्य नसेल तर आपले जीवन कसे असेल? प्रकाशाशिवाय आपण आपले जीवन अंधारात जगू शकतो का? सूर्याचा प्रकाश आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, आपला मार्ग प्रशस्त करतो. सूर्योदय आपल्या मनात नवीन आशा जागवतो की अंधारानंतर प्रकाश आहे, जीवनात दु:खानंतर सुखही आहे. आपण कधीही संकटांनी घाबरू नये.
काही करून दाखवण्याची प्रेरणा देतात चंद्र-तारे
सूर्याबरोबर चंद्र-तारेही आपल्याला काही करण्याची प्रेरणा देतात. चंद्राची शीतल चांदणी आपल्याला शिकवते की सूर्याच्या तप्ततेनंतर चंद्राची थंड शीतलता आहे, फक्त आपण धीर धरावा. चंद्र-तारे आपल्याला काही चांगले, मोठे करण्याची प्रेरणाही देतात. जेव्हा आपण काही चांगले करतो, तेव्हा आपले नाव चंद्र-ताऱ्यांप्रमाणे चमकते. असेही म्हणतात की, जोपर्यंत चंद्र-तारे आहेत, तोपर्यंत तुमचे नाव राहील.
विशाल हृदय असलेली पृथ्वी
पृथ्वीचे हृदय खूप विशाल आहे. ती असंख्य मानव, इमारती, झाडे-झुडपे आणि पर्वतांचे ओझे सहन करते, आपल्याला अन्न, फळ-फुले देऊन आपले पालनपोषण करते. पृथ्वीपासून आपल्याला परोपकार करणे शिकायला हवे. पृथ्वी संपूर्ण जगाचे ओझे उचलून आपल्या धुरीवर चोवीस तास फिरते, जेणेकरून ब्रह्मांडाचे संतुलन कायम राहील. पृथ्वी आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालायला शिकवते.
पर्वत शिकवतात अचल रहायला
पर्वत आपल्याला शिकवतो की, आपण नेहमी आपल्या ध्येयासाठी अडग राहावे, दृढ निश्चयाने रहावे. पर्वत आपल्याला काही मोठे करून अभिमानाने आपले मस्तक उंच करण्याची प्रेरणाही देतो.
धैर्य, हौसला देतात झाडे-झुडपे
आपल्याला माहिती आहे का की, कसे एक छोटेसे बीज अंकुरित होऊन रोपटे बनते आणि हळूहळू एक विशाल फलद्रुप वृक्ष बनते. ऊन, वारा, पावसासारख्या विविध विपरीत परिस्थिती सहन करत एक वृक्ष उभा राहतो. हे केवळ माणसांनाच नाही तर पशु-पक्ष्यांनाही आश्रय, सावली आणि फळे देतो. झाडे आपल्याला कठीण परिस्थितीत धैर्य आणि हौसल्यानिशी ताठ राहण्याची शिकवणी देतात.
फुले देतात हसण्याची शिकवणी
झाडे-झुडपेच नव्हे, तर त्यावर उमलणारी रंगीबेरंगी फुलेही आपल्याला प्रत्येक परिस्थितीत हसण्याची शिकवणी देतात. त्यांचा सुगंध आपल्याला शिकवतो की, जेव्हा तुम्ही गुणवान व्हाल, तेव्हा तुम्हीही फुलांसारखे तुमच्या गुणांनी चारही बाजूंना सुगंधित व्हाल.
लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करायला शिकवते नदी
सपाट मैदान असो किंवा उंच-खोल पठार, नदी प्रत्येक ठिकाणाहून आपला मार्ग बनवतेच. नद्या आपल्याला शिकवतात की, मार्ग कितीही कठीण आणि आव्हानात्मक का असेना, जर धैर्य धरून सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली, तर मार्ग आपोआप बनत जातो. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे की, जीवनात आपण कोणाकडून, काय, किती शिकलो. आपण त्या सर्वांबद्दल आभार मानायला हवे, ज्यांनी एखाद्या शिक्षकाप्रमाणे आपल्याला काही शिकवले, काही करण्याची प्रेरणा दिली. ज्यांनी आपलं जीवन फुलवलं.