journey of historical films: विकी कौशल अभिनीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अलीकडेच प्रदर्शित झालेल्या छावा या ऐतिहासिक चित्रपटाने केवळ दोन दिवसांतच ७२ कोटींचा व्यवसाय करत मोठे यश संपादन केले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जागतिक स्तरावर २०० कोटींचा व्यवसाय केला आहे. असा अंदाज आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा गाठू शकतो.
छावा प्रमाणेच मागील अनेक ऐतिहासिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आहे. मग ते पद्मावत असो, मुघल-ए-आझम, अनारकली, ताजमहल, मणिकर्णिका, बाजीराव मस्तानी, गांधी किंवा द लिजेंड ऑफ भगतसिंग—हे सर्व चित्रपट ऐतिहासिक दृष्टिकोनातून स्मरणीय मानले गेले आहेत. भविष्यातही अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
हिंदी सिनेमाची (historical films) सुरुवात पौराणिक, धार्मिक बरोबरच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मूकपटाने झाली होती.याचं कारण हे की जनमानसात यांच्याशी जुडलेल्या गोष्टी, किस्से,कथा-कहाण्या आणि घटना माहीत होत्या,लक्षात होत्या आणि भाषेशिवाय सिनेमा समजून घ्यायला सोपे पडत होते. नंतर सिनेमा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनण्याचा काळ सुरू झाला. शिवाय ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सिनेमे प्रत्येक दशकात बनू लागले. आजदेखील सिनेनिर्मात्यांना त्यात स्वारस्य असल्याचे आगामी चित्रपटांच्या घोषणांवरून दिसून येत आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना (historical films) नेहमीच विशेष स्थान मिळाले आहे. इतिहासातील महत्त्वाच्या घटनांना, महान योद्ध्यांना आणि संस्कृतीला सन्मानपूर्वक चित्रित करण्याचे काम हे चित्रपट करतात. ऐतिहासिक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना भूतकाळातील शौर्यगाथा, सम्राटांचे जीवन, युद्धे आणि सामाजिक परिस्थिती यांची झलक मिळते.

मूकपट कालखंड आणि ऐतिहासिक चित्रपटांचा उदय
भारतीय सिनेमाची सुरुवात मूकपटांपासून झाली. पौराणिक आणि ऐतिहासिक कथा मांडणारे चित्रपट (historical films) हे प्रेक्षकांना आकर्षित करत होते. १९१३ मध्ये दादासाहेब फाळकेंनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मूकपट प्रदर्शित केला. त्यानंतर ‘लव-कुश’, ‘राम-रावण युद्ध’, ‘सम्राट अशोक’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारखे अनेक ऐतिहासिक चित्रपट त्या काळात तयार करण्यात आले.
हे देखील वाचा: romantic films: परंपरागत प्रेमकथांपासून वेगळ्या 5 रोमँटिक चित्रपटांची सफर
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचे ऐतिहासिक चित्रपट
स्वातंत्र्यपूर्व काळात ऐतिहासिक चित्रपटांमध्ये (historical films) भारतीय संस्कृती, धर्म आणि पराक्रम यांचे दर्शन घडत असे. सोहराब मोदी यांचे ‘सिकंदर (१९४१)’ आणि ‘पृथ्वीवल्लभ’ हे चित्रपट विशेष गाजले. स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांचा एक नवा प्रवाह सुरू झाला. ‘झांशी की रानी (१९५२)’, ‘मुगल-ए-आझम (१९६०)’, ‘अनारकली’, ‘ताजमहल’, ‘रझिया सुलतान’ यांसारख्या चित्रपटांनी ऐतिहासिक सिनेमाला नवा आयाम दिला.
१९८० आणि १९९० चे दशक – ऐतिहासिक चित्रपटांचा सुवर्णकाळ
या काळात ‘गांधी (१९८२)’ आणि ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग (२००२)’ यांसारख्या चरित्रपटांनी विशेष प्रभाव टाकला. स्वातंत्र्यलढा, ऐतिहासिक नायक आणि त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपट या काळात अधिक प्रमाणात बनले.
२१वे शतक – नव्या तंत्रज्ञानासह ऐतिहासिक चित्रपटांचा विस्तार
अलीकडच्या काळात ऐतिहासिक चित्रपट (historical films) अधिक भव्य, प्रेक्षणीय आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण झाले आहेत. संजय लीला भन्साळी यांचे ‘बाजीराव मस्तानी (२०१५)’ आणि ‘पद्मावत (२०१८)’ तसेच अजय देवगणचा ‘तानाजी (२०२०)’ हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले.
अलीकडील आणि आगामी ऐतिहासिक चित्रपट
‘छावा’, ‘स्काय फोर्स’, ‘इमर्जन्सी’, ‘आजाद’ हे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले ऐतिहासिक चित्रपट (historical films) मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. पुढील काळात ‘इक्कीस वार’, ‘लाहोर १९४७’, ‘राजा साहेब’, ‘दिल्ली फाईल्स २’ हे ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना (historical films) नेहमीच मोठे स्थान राहिले आहे. भविष्यातही हे चित्रपट अधिक भव्यदिव्य आणि वास्तवदर्शी पद्धतीने सादर केले जातील, यात शंका नाही. इतिहासातील पराक्रमी योद्धे, महत्त्वाच्या घटना आणि ऐतिहासिक काळातील जीवनशैली नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या चित्रपटांचे योगदान अमूल्य आहे.