जत-सांगोला महामार्गावर

सारांश: जत-सांगोला महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील देवदत्त शिंदे (२०) आणि यशराज शिंदे (१५, रा. शेगाव) या दोघांचा मृत्यू झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत यशराज जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी देवदत्तचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, तर शेगाव गावावर शोककळा पसरली आहे. या मार्गावर वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी होत आहे.

जत

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत-सांगोला महामार्गावर सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा मृत्यू झाला. जतपासून दोन किलोमीटर अंतरावर सागर बाहुबली कापड दुकानाजवळ ट्रक आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत देवदत्त दिलीप शिंदे (वय २०) व यशराज नाना शिंदे (वय १५, दोघेही रा. शेगाव, ता. जत) हे दोघेजण जागीच ठार झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शेगाव गावावर शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा: बॉलीवूड: प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची जादू कमी होत आहे का? Is the magic of films based on love stories decreasing?

अपघाताची गंभीरता:
मिळालेल्या माहितीनुसार, देवदत्त शिंदे हा तरुण चालक म्हणून व्यवसाय करत होता, तर यशराज हा आठवीत शिकत होता. सोमवारी सकाळी दोघे दुचाकीवरून जतकडे जात असताना समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यशराजचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या देवदत्तला जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

जत

अपघातानंतर परिसरात हळहळ:
अपघात इतका भीषण होता की दुचाकी पूर्णपणे ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाली. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवरच थांबवून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच जत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

हे देखील वाचा: Crisis in primary schools: नव्या संचमान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक अतिरिक्त होणार: शिक्षक संघटनांचा तीव्र विरोध; धोरण रद्द करण्याची मागणी; सांगली जिल्ह्यात 5440 शिक्षक

शेगाव गावावर शोककळा:
या दुर्घटनेमुळे संपूर्ण शेगाव गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. मृत यशराजच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. देवदत्त हा कुटुंबाचा आधार होता, मात्र अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर:
जत-सांगोला महामार्गावर वेगाने धावणाऱ्या ट्रक व अवजड वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. या मार्गावर सोळा आणि अठरा चाकी वाहने मोठ्या वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने येथे वेगमर्यादा नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा: गुड्डापूरच्या मंदिरातील विनापरवाना कामे थांबविण्याचे आदेश: पुरातत्त्व विभागाच्या मनाई आदेशानंतरही सुरू होते काम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *