सांगली

आठ महिन्यांपूर्वीच झाला होता त्यांचा प्रेमविवाह

आयर्विन टाइम्स / सांगली
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तासगाव तालुक्यातील नवविवाहित पत्नीवर पतीनेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. आज सकाळी साडेसातच्या सुमारास सांगली कॉलेज कॉर्नर येथे ही घटना घडली. प्रांजल राजेंद्र काळे (वय १९ रा. वासुंबे, तासगाव जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. संशयित हल्लेखोर पती संग्राम संजय शिंदे (२५, रा. सावंतपूर वसाहत, पलूस) हल्ल्यानंतर पसार झाला आहे. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. कौटुंबिक वादातून त्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सांगली

याबाबत पोलिसांसह घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हल्लेखोर संग्राम शिंदे चालक आहे. प्राजंल ही सांगलीतील कॉलेजमध्ये बी. कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. ३ डिसेंबर २०२३ ला प्रांजलने संग्रामशी प्रेमविवाह केला आहे. विवाहानंतर दोन ते तीन महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाला. त्याच्या त्रासाला कंटाळून प्रांजल माहेरी आली होती. तीन महिन्यांपासून ती माहेरीच होती. यानंतर तिला धमकीही दिली होती. त्यावेळी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.

हे देखील वाचा: श्रावणी उपवास: रताळे, वरी, खजूर : आरोग्यदायी फायदे जाणून घ्या; रताळ्यात असतात 15 प्रकारची पोषकद्रव्ये

दरम्यान, आज सकाळी आठ वाजता प्रांजल बसने सांगलीत कॉलेजसाठी आली. कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळच संग्राम तिची वाट पाहत होता. बसमधून उतरून कॉलेजमध्ये जात असताना संग्रामने तिला प्रवेशद्वारावरच अडवले. तेथे दोघांत वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संग्रामने कोयत्याने हल्ला केला. तिच्या हातावर गंभीर वार झाला. प्रांजलच्या ओरड्यानंतर रिक्षाचालक तिच्या मदतीला धावला. युवतीला शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सांगली

घटनास्थळी कॉलेजचे तरुण, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दी होताच हल्लेखोर संग्रामने कोयता व दुचाकी सोडून पलायन केले. अपर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. पोलिसांनी पंचनामा करून कोयता व दुचाकी जप्त केली. हल्लेखोर संग्रामच्या शोधासाठी पोलिसांची पथके पलूस, तासगावकडे रवाना झाली होती. रात्री उशिरा प्राजंल काळे हिने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.
:
पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल : दरम्यान, फिर्यादीनुसार हल्ल्यातील मुख्य संशयित पती संग्राम शिंदे याच्यासह चौघांवर गुन्हे दाखल केले. यात प्रांजलचे सासू, सासरे आणि दीराचाही समावेश आहे. संग्रामविरोधात खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी कलम, तर सासू, सासरे, दीराविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

हे देखील वाचा: स्टार प्रवाहवर नवी मालिका : ‘उदे गं अंबे … कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेचा पार पडला मुहूर्त सोहळा; विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर 3 नंबरची मालिका ‘उदे गं अंबे …’

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत इस्लामपुरात विद्यार्थी गंभीर

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात सहा ते सातजणांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला. अन्वर राजू मुजावर (वय २१, इस्लामपूर जि. सांगली ) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बोरगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयासमोर हा प्रकार घडला. अन्वर याने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश खांडकर, आदित्य लोकरे, ज्ञानदेव ताटे, इरफान (पूर्ण नाव माहीत नाही) व यश कांबळे यांच्यासह अन्य अनोळखी दोघे अशांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सांगली

पोलिसांनी माहिती दिली की, अन्वर त्याचा मित्र साद इरफान ढगे महाविद्यालयाच्या आवारात छायाचित्र काढत होते. गणेश खांडकर तिथे आला. ‘माझ्या मित्रांजवळ काय बोललास ?” असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. आदित्य लोकरे याने अन्वरचा शर्ट फाडून मारहाण केली. थोड्या वेळाने अवसाद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आले असता गणेश, आदित्य यांच्यासह ज्ञानदेव, इरफान, यश व अन्य अनोळखी दोघांनी मिळून अन्वरला शिवीगाळ केली.

यशने हॉकी स्टिकने पाठीत मारहाण केली, तर ज्ञानदेवने स्टिकने डोक्यात मारले. अन्वरचा भाऊ सलमान राजू मुजावर भांडण सोडवण्यासाठी आला असता इरफानने मारहाण केली. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

हे देखील वाचा: sangli crime : सांगलीतील हरिपुरात घरफोडी: 40 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 लाख लंपास ; दोन बंगले, मंदिरात चोरी; सुमारे तीस लाखांचा ऐवज चोरटयांनी पळविला

सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडीच्या दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू

दुचाकीच्या आडवे आलेल्या कुत्र्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात बहादूरवाडी (ता. वाळवा जि. सांगली) येथील युवतीचा बुधवारी मृत्यू झाला. जयश्री सुरेश घोरपडे (वय १९) असे युवतीचे नाव आहे. आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सुरेश घोरपडे यांनी फिर्याद दिली. आष्टा पोलिस व अपघात स्थळावरून मिळालेली माहिती : इस्लामपुरातील एका महाविद्यालयात बीए प्रथम वर्षात शिकत होती. आज सकाळी घोरपडे कुटुंबियांच्या घरी कार्यक्रमानिमित्त सर्वजण जमले होते.

 

सांगली

जयश्रीला महाविद्यालयात जायचे होते. जयश्रीला चुलत भाऊ मनोज मोहन घोरपडे दुचाकी (एम. एच. १०, ई. जी. ७९९४) वरुन बहादुरवाडी येथून तांदुळवाडीपर्यंत सोडायला गेला होता. तेथून जयश्री बसने इस्लामपूरला जाणार होती. लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ अचानक दुचाकीच्या आडवे कुत्रे आले. मनोजचा दुचाकीवरील ताबा सुटला. मनोज व जयश्री दोघेही रस्त्यावर पडले. जयश्रीला आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *