सरकारी शाळा

सारांश: राज्यात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या लक्षात घेऊन, शिक्षण विभागाने काही शाळा बंद करून त्यांना “हब अँड स्पोक मॉडेल”मध्ये समाकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा मोठ्या शाळांमध्ये विलीन करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा उद्देश आहे. यासाठी “तालुकास्तरीय शिक्षण सुधारणा समित्या” स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्णयावर विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा आणि विरोध सुरू आहे.

सरकारी शाळा

बंगळूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या लक्षात घेऊन, शिक्षण विभागाने काही सरकारी शाळा बंद करून त्यांना हब अँड स्पोक मॉडेलमध्ये समाकलित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे शाळा विलीनीकरणाच्या वादग्रस्त विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा: benefits of CBSE pattern: शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठी ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू: इयत्ता पहिलीचे वर्ग येत्या एक एप्रिलपासून सुरू होणार; राज्यात आता शैक्षणिक धोरणाचा नवीन टप्पा; सीबीएसई पॅटर्नचे फायदे जाणून घ्या

हब अँड स्पोक मॉडेल म्हणजे काय?
या मॉडेलअंतर्गत अत्यंत कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या मोठ्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मोठ्या शाळा “हब” म्हणून विकसित केल्या जातील, जिथे उच्च दर्जाचे शिक्षण, गुणवत्ता सुधारणा आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक साधने उपलब्ध होतील. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे सामाजिकरण सुधारेल आणि त्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ होईल, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण
राज्यात ४६,७५५ सरकारी शाळा असून, त्यातील ४,२६५ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. तसेच, ५,४१२ शाळा सह-शैक्षणिक आहेत. सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येते. खाजगी शाळांच्या आकर्षक सुविधांमुळे पालक सरकारी शाळांकडे पाठ फिरवत असल्याचा शिक्षणतज्ज्ञांचा कयास आहे.

हे देखील वाचा: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा ‘अटल’ उपक्रम: मंत्री चंद्रकांत पाटील/ ‘Atal’ initiative to boost confidence among students

शिक्षण सुधारणा समितीची स्थापना
शालेय शिक्षणाच्या सुधारणा आणि निर्णय प्रक्रियेसाठी “तालुकास्तरीय शिक्षण सुधारणा समिती” स्थापन करण्यात आली आहे.
– संरचना: या समितीत तालुक्याचे आमदार अध्यक्ष असतील. याशिवाय तहसीलदार, जिल्हा पंचायत सीईओ, शिक्षण अधिकारी, आणि इतर १४ सदस्यांचा समावेश असेल.
– कर्तव्ये: कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर उपाययोजना सुचवणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी धोरणे आखणे, आणि हब शाळांचे नियोजन करणे ही या समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

सरकारी शाळा

विलीनीकरणाचा वादग्रस्त मुद्दा
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा मुद्दा नवा नाही. मात्र, कोणतेही सरकार सत्तेत असताना यावर ठोस निर्णय घेण्यास टाळाटाळ करते. विरोधक हा विषय उचलून धरत असल्याने विलीनीकरणासमोर अडथळे येतात. यावेळी “विलीनीकरण” हा शब्द न वापरता “कॉम्बिनेशन” हा नवीन शब्दप्रयोग केला गेला आहे. त्यामुळे बंद होणाऱ्या शाळांच्या भवितव्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

हे देखील वाचा: quality education: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शालेय शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर राहील; शालेय शिक्षण विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्याचे झाले सादरीकरण

शिक्षणात गुणवत्ता टिकवण्याचे आव्हान
राज्य सरकारचा हा निर्णय काही शाळा बंद करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न आहे, की त्यातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे आणि सरकारी शाळांवरील विश्वास परत मिळवणे हा मोठा आणि दीर्घकालीन मुद्दा आहे.

राज्य सरकारने हब अँड स्पोक मॉडेलचा प्रस्ताव मांडून शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा निर्णय मुलांच्या भवितव्यासाठी योग्य ठरेल की नव्या अडचणी निर्माण करेल, यावर वेळच उत्तर देऊ शकेल.

देशभरात कमी पटाच्या सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला गेला आहे. झारखंड, मध्य प्रदेशात अशा शाळा बंद करून शाळासमूह योजना अंमलात आणली गेली आहे. शेजारील महाराष्ट्रातदेखील कमी पटांच्या शाळा बंद करून शाळासमूह योजना राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागणार आहे. मात्र यासाठी परिवहनाच्या व्यवस्था काय असणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *