श्रावण

श्रावण महिना शिवभक्तीसाठी विशेष

सनातन धर्मात श्रावण महिना हा शिवभक्तीसाठी विशेष मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. या काळात सोमवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत. पूजा गृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्व प्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर चंदन, अक्षता, बेलपत्रासह सर्व पूजेचे साहित्य एक एक करून अर्पण करावे. त्या दरम्यान शिव मंत्राचा जप करावा. सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी. नंतर भगवान शंकराला नमस्कार करून बसावे. त्यानंतर शिव चालिसाचे पठण करावे.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 30 जुलै: सिंह राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभ / Financial benefits, जाणून घ्या आजच्या राशीत कोणाला मिळणार नोकरीत बढती

मग सोमवारची व्रत कथा वाचावी. शेवटी तुपाचा दिवा लावावा किंवा कापूर जाळून भगवान शंकराची आरती करावी. शेवटी पूजेदरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी. त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्याची विनंती भगवान शंकराला करावी. हिंदी पंचांगानुसार २२ जुलैपासून श्रावण मास सुरू झाला आहे.

श्रावण

७१ वर्षांनंतर यंदा श्रावणात पाच सोमवारचा दुर्मीळ योग

२०२४ मध्ये भगवान महादेवाच्या उपासनेचा श्रावण मास येत्या पाच ऑगस्ट रोजी सुरू होत असून, तीन सप्टेंबरला या महिन्याची समाप्ती होत आहे. यंदाच्या श्रावणात पाच सोमवारचा दुर्मीळ योग आला आहे. यावर्षी श्रावण मास सोमवारी सुरू होणार असून, सोमवारीच समाप्ती होत आहे. त्यामुळे यावर्षी महादेवाच्या भक्तांसाठी पाच सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे. तब्बल सात दशकानंतर हा योग आला आहे. २००६ मध्येदेखील पाच श्रावण सोमवार आले होते. तर २०२३ मध्ये अधिक मासामुळे श्रावण दोन महिने चालला होता. त्यामुळे अनेकांनी त्यावेळी आठ श्रावण सोमवार केल्याचे सांगण्यात आले.

प्राचीन रोमचा ॲपियन मार्ग: आता जागतिक वारसा

इटलीतील प्राचीन रोमन ‘अपियन वे’ चा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage Site) यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. या यादीत इटलीची ही 60 वी एंट्री आहे. प्राचीन रोमचा ‘अपिअन वे’ वरील अप्पिया अँटिकाच्या अवशेष पाहायला पर्यटक जातात. इसपूर्व ३१२ मध्ये बांधलेला ‘व्हाया ॲपिया’ हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा रोमन रस्ता होता आणि रोमन लोक ‘रेजिना व्हायरम’ किंवा ‘रस्त्यांची राणी’ म्हणून ओळखत होते. युनेस्कोच्या मान्यतेमध्ये दक्षिण-पूर्व इटलीमधील रोम ते ब्रिडिसीपर्यंतच्या ‘अपिया वे’चा संपूर्ण मार्ग समाविष्ट आहे. बेनवेनेटो ते ब्रिडिसीपर्यंत सम्राट ट्राजानने बांधलेल्या ‘व्हाया ट्रायाना’चाही समावेश आहे. इसपूर्व ३१२ मध्ये दक्षिण इटलीच्या विजयासाठी लष्करी पुरवठा आणि दळणवळणाचा मुख्य मार्ग म्हणून ‘अपियन वे’ वापरला गेला होता.

हे देखील वाचा: Crime News : सांगलीच्या 21 वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून पुणे जिल्ह्यात खून; आरोपीला अटक; खून करणारा संशयित आरोपीदेखील सांगली जिल्ह्यातील

कर्करोगाच्या रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण डोके, गळ्याशी संबंधित कर्करोगाने ग्रस्त

धक्कादायक! तरुणांमध्ये डोके, गळ्याशी संबंधित कर्करोग वाढत आहे. भारतात तरुणांमध्ये डोके आणि गळ्याशी सबंधित कर्करोगाचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कर्करोगाच्या रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण या प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. ‘जागतिक डोके आणि गळा कर्करोग दिना’निमित्त एक संशोधन अहवाल जारी करण्यात आला. त्यातून ही माहिती प्राप्त झाली आहे. कर्करोग मुक्त भारत माहिमेचे नेतृत्त्व करणारे कर्करोगतज्ज्ञ डॉ. आशीष गुप्ता म्हणाले, तंबाखूचे वाढते सेवन आणि ‘एचपीव्ही’ विषाणूचा संसर्ग ही प्रमुख कारणे आहेत. १,८६९ कर्करुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. ८०-९० टक्के मुखाचे कर्करोग रुग्ण अतंबाकूचे सेवन करत होते. ६६ टक्के कर्करोगाचे निदान उशिरा होते.

लेखिका सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे. सुधा मूर्ती या नामवंत लेखिका आहेत. त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या सहसंस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळूर शहर व परिसरात त्यांनी सुमारे दहा हजार स्वच्छतागृहे उभारली आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य देशाच्या विकासाला चालना देणारे ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मराठी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमधून त्यांनी लेखन केले आहे.

पुणे रेल्वे स्थानकाने शंभराव्या वर्षात पदार्पण

पुणे रेल्वे स्थानकाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. वाफेच्या इंजिनपासून सुरू झालेला भारतीय रेल्वेचा प्रवास आता बुलेट ट्रेनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. देशात १६ एप्रिल १८५३ साली पहिली प्रवासी रेल्वे धावली. या १७१ वर्षात रेल्वेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. ब्रिटिश काळात व्यापारासाठी व सैन्याच्या वाहतुकीसाठी सुरू झालेली रेल्वे सेवा आता देशांतर्गत वाहतुकीचे सर्वात मोठे व प्रभावी माध्यम ठरले आहे. मुंबई-चेन्नई या सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरचे पुणे हे महत्त्वाचे स्थानक आहे.

हे देखील वाचा: Kavthemahankal Crime : कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी, केरेवाडीत सशस्त्र दरोड्यात लूट; दागिन्यांसह रोकड असा सुमारे 2 लाखांचा ऐवज लुटला; पोलिसांचा पाठलाग-एक दरोडेखोर ताब्यात

१८५८ साली पुणे स्थानकाची निर्मिती झाली. १८५८ साली पुण्याहून रेल्वे धावण्यास सुरुवात झाली. त्यावेळेचे छोटेसे स्थानक काळाच्या ‘चक्रा’त मागे पडले. पुण्याहून प्रवासी वाढू लागले अन स्थानकाने देखील कात टाकली. स्थानकाच्या मुख्य इमारतीला ९९ वर्षे पूर्ण होऊन १०० व्या वर्षात ‘प्रवास’ सुरू झाला. सहा फलाट, १५७ प्रवासी रेल्वे असलेल्या स्थानकातून रोज दीड लाख लोक प्रवास करतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *