दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून

जशपूरनगर: (आयर्विन टाइम्स वृत्तसंस्था):
घरात रोजची दारूची नशा, शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला कंटाळून एका १५ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांचा धारदार कुराडीने वार करून खून केल्याची संतापजनक घटना छत्तीसगड राज्यातील जशपूरनगर जिल्ह्यातल्या  बागबहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सततच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या मुलीने अखेर रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं.

दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून

शेजाऱ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न
२२ एप्रिल २०२५ रोजी बागबहार पोलिसांना माहिती मिळाली की, परिसरातील एका गावात ५० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत पलंगावर आढळून आली आहे. त्याच्या डोक्यावर कुराडीने गंभीर वार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. सुरुवातीला हा प्रकार अज्ञात आरोपीने केल्याचा संशय होता, मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे फिरवली.

हेदेखील वाचा: 30 हजार रुपयांची लाच घेताना कृषी विभागाचा निरीक्षक रंगेहात अटकेत; जिल्हा कृषी कार्यालय, सांगली येथे एसीबीची कारवाई

रडत शेजाऱ्यांकडे गेली, पण सत्य उजेडात आलं
हत्या झाल्यानंतर रात्री सुमारे साडे नऊच्या सुमारास पीडित व्यक्तीची मुलगी शेजाऱ्यांकडे जाऊन रडत होती. तिने सांगितले की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या वडिलांवर कुराडीने हल्ला केला आहे. मात्र तपासादरम्यान शेजाऱ्यांनीच पोलिसांना संशय व्यक्त केला की या घटनेत मुलीचाच सहभाग असू शकतो.

कबुलीनंतर खळबळ उडाली
पोलीस चौकशीत व तिच्या आईसमोर झालेल्या मेमोरँडममध्ये त्या अल्पवयीन मुलीने गुन्ह्याची कबुली दिली. ती म्हणाली, “वडील नेहमी दारू पिऊन मला आणि आईला शिवीगाळ करत असत, मारहाण करायचे. त्या दिवशी संध्याकाळी आई माहेरी गेली. वडील रात्री पुन्हा दारू पिऊन आले आणि भांडण करत मला मारायला लागले. संतापाच्या भरात मी घरातल्या कुराडीने त्यांच्या डोक्यावर वार केला.”

पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, कबुली आणि साक्षांच्या आधारे मुलीला २३ एप्रिल रोजी ताब्यात घेतलं असून, तिची चौकशी करून किशोर न्याय मंडळासमोर हजर केलं आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, घरगुती हिंसाचाराच्या दुष्परिणामांचा धक्कादायक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *